बो ल, काय म्हणावे तुला?
यार? दोस्त? अझीझ?
की आणखी गळ्यात पडून
म्हणू : भाईजाऽऽन?
...की आणखी काही?
असे वाटते की,
पसरावेत दोन्ही हात आणि
म्हणावे तुला, मेरे यार, मेरे हम नफस,
हम नवॉं, मेरे हमदम, मेरे दोस्त...
मारावी कडकडून मिठी,
चिंतावे थोडे वा बहुत
अभीष्ट तुझ्या वृद्धी
आणि शानो-शौकतसाठी.
किंवा गेलाबाजार,
टाकावा सहजच हात
तुझ्या खांद्यावर,
विचारावे कुशलमंगल,
द्यावी बधाई किंवा सौगात.
अगदीच नाही जमले तर
किमान तुझा शीतोष्ण पंजा
घ्यावा ऊबदार हातात.
द्यावे स्वत:लाच एक
(फ्रेम करण्याजोगे) प्रशस्तिपत्र
बेजोड दोस्तदारीचे.
की-
हासडावी एखादी इरसाल शिवी
मनातल्या मनात?
आणि दातओठ खात
घुसवावीत वाघनखे,
जमतील तितकी खोल,
तुझ्या आंतड्यात?
खुपसावा निर्णायक खंजीर
थेट तुझ्या उलट्या काळजात,
आणि करावा शेवट
साऱ्याचा...एकदाचा?
उधळून लावाव्यात तुझ्या
राहुट्या, कापून न्यावेत
त्यांचे सुनहरे कळस?
भरडून काढावे तुला
तोफगोळ्यांच्या भडिमारात
जागोजाग पेरावेत सुरुंग
आणि धुळीस मिळवावेत,
तुझे सारेच नापाक मनसुबे
उभारावी अशी बुलंद दीवार
सरहद्दीच्या या टोकापासून
त्या टोकापर्यंत की,
एव्हरेस्टलाही पछाडावे
खुजेपणाच्या न्यूनगंडाने.
पाडावा (कृत्रिम) पाऊस
रक्ताचा इथे...आणि तिथेही?
कारण-
बघितले आहे अनेकवार,
तुझ्या कोरीव पठाणी दाढीत
दडलेले घातक छद्म.
हस्तांदोलनाच्या वेळी
तुझ्या मस्तकावरली
तडतडणारी शीर.
तुझ्या बेजोड इस्तकबालात,
आणि बेमिसाल दावतीच्या
गर्दीत फिरणाऱ्या
गारद्यांच्या भयंकर सावल्या.
दोस्तान्याच्या बैठकीत
सौहार्दाच्या पडद्याआड
नंग्या तलवारीसह
दडलेला सैयद बंडा!
तुझ्या दुश्मनीला आहे,
दोस्तीचा दर्प, आणि
दोस्तीत दर्वळतो आहे,
दुश्मनीचा दुर्गंध
...अगदी एकाच वेळी.
मग आम्ही कसा बरे
करावा तुझा एतबार, ऐ दुश्मन?
कशी मारावी संभावित मिठी,
आणि द्यावे आमचे भवितव्य
अभाविताच्या कपटी हातांत?
कसे रचावेत कसीदे
यारीचे आणि ईमानदारीचे?
कशी करावी नुमाईश
आमच्या बेखौफ जिंदगीची.
कशी द्यावी मिसाल,
निहायत खूबसूरत भाईचाऱ्याची?
चलो, तो इक करार करते हैं...
जब तक है भरोसा तेरे दुश्मनीपर
दोस्ती का करेंगे इकरार
जब तक है यकीन तेरे दोस्तदारीपर
दुश्मनी का करेंगे एतबार...
अमन नाम की भी तो कोई
चीडिया होती है ना,
मेरे अझीझ दुश्मन!☜☜☜
Thursday, 30 June 2016
खास आवडले असे ...लेखक - अनामिक
Monday, 20 June 2016
शिवसेना , काल , आज आणि उद्या ही ......!!!!
शिवसेना ५० वर्षाची झाली , सुवर्ण महोत्सव साजरा झाला ...!!!
प्रबोधनकारांच्या आशीर्वादाने आणि जीवलगांच्या साथीने बाळासाहेबांनी कार्यारंभ केला ...!!!
ऐन उमेदीच्या काळात बाळासाहेबांनी महाराष्ट्रात निष्ठावंत अशी जवळजवळ अख्खी एक पिढीच निर्माण केली असे म्हटले तर वावगे ठरू नये ...!!!
हाच शिवसेनेचा मुख्य आधारस्तंभ आहे आणि राहिल ...!!!
मधल्या काळात अनेक स्थित्यंतरे ,उलथापालथ झाली ,यातुन शिवसेना ताऊन सुलाखून निघाली आणि अधिक मजबूतीने उभी राहीली ....!!!
याला कारण हा मजबूत आधार स्तंभ आहे आणि असा आधारस्तंभ दुसर्या कुण्या नेत्याला लाभला आहे असे किमान माझ्या तरी माहिती मधे नाही ...!!!
महाराष्ट्र 1 वर आजचा सवाल मधील विचारवंतांच्या चर्चेत शिवसेनचा वर्तमान आणि भविष्यकाळ याविषयी बराच उहापोह झाला ....!!!
सेनेचा भविष्य काळही अधिक उज्वल असेल असे सर्वांना वाटत आहे ....!!!
शिवसेना उभी आहे ती शिवसैनिकांच्या बळावर ,कुण्या नेत्याच्या पैशावर वा गल्लाभरू कार्यकर्त्याच्या जोरावर नव्हे ...!!!
शिवसैनिक हेच शिवसेनेचे प्राण आहेत आणि ते वगळता सेना असु शकत नाही ...!!!
बाळासाहेबांच्या विचारांना आणि संघटनेला कोटीकोटी प्रणाम आणि शुभेच्छा ...!!!
जय महाराष्ट्र ...!!!
❤❤❤❤❤
_
रवि॑द्र किसनराव झांबरे पाटील