Wednesday, 20 July 2016

उपनिषदे काय सांगतात ...???

काळ अखंड पणे वाहत असतो . काळ जसा पुढे जातो तसे मानवी जीवन बदलते . सामाजिक जीवनात नवीन पणा आला म्हणजे माणसाचे खाणे पिणे , कपडेलत्ते , घरदार , यंत्र व वाहने यात बदल होतो तरीही माणसाचे मुळ स्वरूप म्हणजे अंतरंग तेच राहते . माणसाच्या वासना , आशा आकांक्षा , सुखदुःख , राग द्वेष यामध्ये युगानुयुगे फरक पडत नाही . याचा परिणाम असा होता की जीवना संबंधित काही चिरंजीव प्रश्न सर्व काळी सर्व ठिकाणी माणसाच्या मनाला उत्तर शोधण्यासाठी टोचणी देत राहतात ...!!!
१} माणसाचे खरे समाधान कशात आहे ?
२} जीवनात नशीब व प्रयत्नाचा भाग किती ?
३}चांगले काय माहीत असुनही माणूस वाईटाच्या मागे का लागतो ?
४}मृत्युनंतर माणसाचे जीवन आहे का ?
५}विश्व का , कसे व कुणी निर्माण केले ?
६}अमरत्व कशाने मिळेल ?
७} मानवाचे अंतिम ध्येय काय ?
८} सर्वोत्तम आनंद कोणता ?
९} विश्वाचे मुलद्रव्य कोणते?
१०} जीवंतपणी मुक्तावस्था येते का ?
       हे प्रश्न अनादीकाळा पासून मानवी मनाला बोचकारत आले आहेत . माणूस , जगत आणि ईश्वर यांचे मुलस्वरूप आणि परस्पर संबंध असताना हे प्रश्न का उभे राहतात ?
माणूस बुध्दिमान प्राणी असल्याने या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी माणसाचीच आहे ...!!!
       उपनिषदकार ऋषींनी या सर्व प्रश्नांची समाधान कारक उकल केल्याचे आढळते ...!!!

No comments:

Post a Comment