काळ अखंड पणे वाहत असतो . काळ जसा पुढे जातो तसे मानवी जीवन बदलते . सामाजिक जीवनात नवीन पणा आला म्हणजे माणसाचे खाणे पिणे , कपडेलत्ते , घरदार , यंत्र व वाहने यात बदल होतो तरीही माणसाचे मुळ स्वरूप म्हणजे अंतरंग तेच राहते . माणसाच्या वासना , आशा आकांक्षा , सुखदुःख , राग द्वेष यामध्ये युगानुयुगे फरक पडत नाही . याचा परिणाम असा होता की जीवना संबंधित काही चिरंजीव प्रश्न सर्व काळी सर्व ठिकाणी माणसाच्या मनाला उत्तर शोधण्यासाठी टोचणी देत राहतात ...!!!
१} माणसाचे खरे समाधान कशात आहे ?
२} जीवनात नशीब व प्रयत्नाचा भाग किती ?
३}चांगले काय माहीत असुनही माणूस वाईटाच्या मागे का लागतो ?
४}मृत्युनंतर माणसाचे जीवन आहे का ?
५}विश्व का , कसे व कुणी निर्माण केले ?
६}अमरत्व कशाने मिळेल ?
७} मानवाचे अंतिम ध्येय काय ?
८} सर्वोत्तम आनंद कोणता ?
९} विश्वाचे मुलद्रव्य कोणते?
१०} जीवंतपणी मुक्तावस्था येते का ?
हे प्रश्न अनादीकाळा पासून मानवी मनाला बोचकारत आले आहेत . माणूस , जगत आणि ईश्वर यांचे मुलस्वरूप आणि परस्पर संबंध असताना हे प्रश्न का उभे राहतात ?
माणूस बुध्दिमान प्राणी असल्याने या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची जबाबदारी माणसाचीच आहे ...!!!
उपनिषदकार ऋषींनी या सर्व प्रश्नांची समाधान कारक उकल केल्याचे आढळते ...!!!
Wednesday, 20 July 2016
उपनिषदे काय सांगतात ...???
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment